टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. तसेच सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदू पाटील गिर्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच गिर्हे यांच्या भाजप प्रवेशाने मात्र चंद्रकांत दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी गिर्हे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्वाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहे असे गिर्हे म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्थिरते वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181489078618984448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181485306702434304?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

