Share

Nana Patole | नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच ; नाना पटोले यांचा आरोप

Published On: 

औरंगाबाद : नाशिक येथे अतिशय थरारक अशी घटना घडली आहे.नाशिक येथील मिरची चौक येथे एका प्रायव्हेट लक्झरी बसचा टँकर सोबत भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला आणि क्षणात या बसची राख झाली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अशातच या घटनेवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?

नाशिकमध्ये झालेला अपघात खड्ड्यांमुळेच झाला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील रस्त्यांची परिस्थिती या अपघातामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. रोज अपघातांसारखा जीवघेणा प्रकार सुरू आहे. हे सर्व पाप राज्यातील ईडीच्या म्हणजे भाजप प्रणित सरकारचं आहे.

महाविकास आघाडीच्या काळात झालेली कामे, बजेटमध्ये झालेली कामे बंद करून टाकली. काही कामांना स्थगित दिली. यामुळे कामे झाले नाहीत. कामेच बंद असल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे वाचवण्यासाठी हा प्रकार होतो आणि यामुळेच आता हा अपघात झाला असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. किती लोकांचा जीव राज्याचे ईडीचे भाजप प्रणित सरकार घेणार?, असा खोचक सवालही नाना पटोले यांनी याठिकाणी केला आहे.

दरम्यान, नाशिक येथील मिरची चौकात ही धक्कादायक घटना घडली असून, चिंतामणी ट्रॅव्हल्सची प्रायव्हेट लक्झरी बस मिरची चौकात असताना टँकरसोबत धडकली. यानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातानंतर बसने पेट घेतला. यामध्ये 10 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अनेक प्रवाश्यांनी खडकीतून उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. तब्बल अर्धा तास या गाडीने पेट घेतला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!