Share

बदली रॅकेटमध्ये हस्तक्षेप प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सीबीआय संचालकांना समन्स

Published On: 

मुंबई : मुंबई पोलिसांनी सबीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यासंदर्भात फोन टॅपिंग प्रकरणी समन्स बजावले आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायबर सेलच्या मुंबई कार्यालयात हजर रहाण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. जयस्वाल यांनी पदाच्या कार्यकाळात फोन टॅप करुन अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांचे कागदपत्रे लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.

१९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेशन ब्युरोच्या प्रमुख पदी मे २०२१ रोजी पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचे सायबर सेल या प्रकरणाचा गोपनीय कायद्यातंर्गत तपास करत आहेत. तपासात सीबीआय संचालक जयस्वाल यांचा हस्तक्षेप आढळून आल्याने ही चौकशी केली जाणार आहे.

२०२० वर्षी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. त्यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी तत्कालीन डीजीपी सुबोध जयस्वाल यांना एक गुप्त अहवाल पाठवला होता. त्यात अनेक आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांचे फोन टॅप करुन त्यांचे संभाषणाचा तपशील होता. जयस्वाल यांनी हा अहवाल तत्कालीन एसीएस होम सीताराम कुंटे यांना पाठवत चौकशीची मागणी केली होती.

या अहवालानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर बदली रॅकेट गैरव्यवहाराचा आरोप केला होता. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु आहे. रश्मी शुक्ला यांनी २०१९ या वर्षी फोन टॅप केले होते असा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यातील एक नाव अज्ञात असे नोंदविले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!