टीम महाराष्ट्र देशा – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ तारखेला पंचायती राज दिवसाचे औचित्य साधून देशातील सरपंचांशी व्हीडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत याबाबतच माहिती त्यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
या संवाद दरम्यान इ- ग्राम स्वराज्य पोर्टल आणि मोबाइल अॅ पचीही सुरवात केली जाणार आहे. तसेच स्वामित्व या केंद्र सरकारच्या नव्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे असंही मोदींनी सांगितलं आहे.
या योजनेची सुरवात ग्रामीण भागातील विकासाला गती देऊन या भागातील गरिबी दूर करण्यावर भर असेल असही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे.
देशात कोरोनाच संकट असल्यामुळे लॉक डाऊन करण्यात आलं आहे. वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील शेती उत्पादने शहरातील बाजारात येऊ शकत नाही . त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होत आहे. आता पंतप्रधान याबाबतही काय बोलताय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
24 अप्रैल को इस वीडियो कॉन्फ्रेंसिंग के दौरान e-GramSwaraj पोर्टल और मोबाइल ऐप लॉन्च किया जाएगा। इसके साथ ही स्वामित्व योजना भी लॉन्च होगी, जिससे ग्रामीण क्षेत्रों में विकास के प्रयासों को गति मिलेगी।
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

