Share

‘मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन’ ; आठवलेंचा पवारांना काव्यमय टोला

Published On: 

मुंबई : मोदी आहेत नंबर वन त्यामुळे विरोधी पक्षांचे दुःखी आहे मन ! मोदी देणार आहेत सर्व राज्यांना विकासासाठी धन; म्हणून जवळ आला आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा 2024 चा क्षण! अशा खास आपल्या काव्यमय शैलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘तिसरी आघाडी बनली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए ला काही फरक पडणार नाही.

तिसरी आघाडी सारख्या आणखी कितीही आघाड्या बनल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला काही फरक पडणार नाही’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. ‘माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी तयार होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राबाहेर फारसा प्रभाव नाही.

राष्ट्रमंच नावाने तिसरी आघाडी निर्माण झाली तर त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. त्यामुळे तिसरी आघाडी ही एनडीए चे नाही तर काँग्रेसचेच नुकसान करील.’ असा दावा ना रामदास आठवले यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!