कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी 27 गावांबाबत इथल्या लोकांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. लोकांच्या भावना असतील तर 27 गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना त्यावेळी दिले.
याच पार्श्वभूमीवर 27 गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना त्यावेळी दिले. तर मुख्यमंत्र्यांची नियत साफ दिसते परंतु नगरविकास खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री यांची नियत साफ दिसत नाही,’ असे म्हणत शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच येत्या आठवड्यात याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचम राजू म्हणाले. आ. राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, नवीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे चांगले काम करत असून त्यांच्या कामातून आपल्याला सकारात्मक संकेत मिळत आहेत, असे म्हणत पाटील यांनी आयुक्तांच्या कामाबाबत कौतुक केले.


