टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे आहे. मात्र सीबीएससी आणि आय़सीएससी काही शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे करण्यासाठी कायदा अधिक कठोर करून त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली, दरम्यान, मनसेने मुख्यमंत्र्यांना आव्हान देत सीबीएसई ज्ञानप्रबोधिनी सारख्या शाळांमध्ये १० वी पर्यंत मराठी शिकवणे सक्तीचं करण्याची हिंमत दाखवणार का? असे म्हंटले आहे.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विटकरत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे, मराठी सक्तीचं ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी पण कितवीपर्यंत सक्तीचं याचा तपशील कळला नाही. सीबीएसई, ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळांना १० वी पर्यंत सक्तीचं करण्याची हिंमत ते दाखवणार का? याची कडक अंमलबजावणी याच वर्षी होणार का? असा सवाल शिदोरे यांनी केला आहे.
मराठी सक्तीचं ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी @CMOMaharashtra केली खरी पण कितवीपर्यंत सक्तीचं ह्याचा तपशील कळला नाही. सीबीएसई च्या शाळांना, ज्ञानप्रबोधिनीसारख्या, १० पर्यंत सक्तीचं करण्याची हिंमत ते दाखवणार का? ह्याची कडक अंमलबजावणी ह्याच वर्षी होणार का?
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) June 21, 2019
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार. त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचेही त्यांनी मान्य केले हे ही स्वागतार्ह.. आता आपली जबाबदारी ही की प्रत्येक शाळेत ह्याची अंमलबजावणी होते आहे की नाही हे पहाणे .. जय महाराष्ट्र !
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) June 21, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

