Share

तिवरे धरण प्रकरणातील दोषींवर जलसंपदामंत्री कारवाई करणार का ? – मनसे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : चिपळूणमधील तिवरे धरणाच्या दुर्घटनेवरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला आहे. तिवरे धरणाच्या दुर्घटनेला जबाबदार कोण? आणि जलसंपदामंत्री या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करणार का? असा सवाल मनसेने केला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर आॅकाउंट वरून हा सवाल करण्यात आला आहे.

काल ( २ जुलै, मंगळवार ) रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. यामध्ये २४ जण वाहून गेले. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला १२ तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण फुटल्यानं १३ घरं वाहून गेल्यानं वित्तहानीदेखील झाली.

दरम्यान अतिवृष्टीमुळे तिवरेधरण ओसंडून वाहू लागलं, त्यामुळे धरण फुटलं अशी माहिती समोर आली आहे. पण मुळात धरणाची डागडुजी नियमितपणे होत होती का?, असा सवाल मनसेने केला.

इतकेच नव्हे तर धरणातील गाळ कधी काढला गेला? आणि ह्या प्रकाराला नक्की जबाबदार कोण? ह्याची चौकशी करून जलसंपदामंत्री संबंधितांवर कडक कारवाई करणार का?, असा सवालही मनसेने केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!