मुंबई : भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे. उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत. अशाप्रकारे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
देशातील सध्याची परिस्थिती पाहिली असता, पद्धतीने उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं आहे. केंद्राने त्यांचे कौतुक केलं आहे. राज्य सरकारने कोरोना असताना देखील मुंबईमध्ये चांगलं काम केलेलं आहे. भाजपला हे समजत नाही. अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
‘चीनच्या डोळय़ांत डोळे घालून बघणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल’
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार फोल ठरतेय, असं म्हणत भाजपकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे.
मग तुम्ही काय फक्त मातोश्रीत बसुन गोट्या खेळणार का ? नितेश राणेंचा घणाघात


