पंढरपूर :गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा अजूनही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर झालेली मराठा आरक्षण याचिका सुनावणी पुन्हा लांबल्याने राज्यात पुन्हागेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा अजूनही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर झालेली मराठा आरक्षण याचिका सुनावणी पुन्हा लांबल्याने राज्यात पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरूच असतानाच आता सकल मराठा समाजाच्या वतीने ७ नोव्हेंबरला पंढरपूर- ते- मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या चरणी नसमस्तक होऊन मराठा आक्रोश मोर्चाच सुरुवात होणार आहे. हा आक्रोश मोर्चा पायी दिंडीच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी या आंदोलनाची घोषणा केली. तसेच सरकारने किती दबाव टाकला तरीही आता माघार घेणार नसल्याचा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. आता ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी महेश डोंगरे, दीपक वादडेकर, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.
सकल मराठा समाज समन्वयक महेश डोंगरे म्हणाले, आरक्षण मिळवण्यासाठी शहीद झालेल्या बांधवांना १० लाख रुपये मिळाले नाहीत, ते देण्यात यावे. महाराष्ट्र राज्य महामंडळात नोकरी देखील देण्याचे आश्वासन पूर्ण करावे. राज्य सरकार गांभर्याने घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने प्रश्न सोडवावा, असे आवाहन करत या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक आणि मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- राजू शेट्टीनी भरला हुंकार ; यापुढे कृषी आंदोलनं दिल्लीत होतील
- भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या अर्णबवरील कारवाईमुळेच भाजपचे आकांडताडंव
- ‘भारत कोरोनावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे’
- कोरोना प्रतिबंधक लस उपलब्धतेनंतर जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी झाली सुरु
- कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेस कडून भव्य ट्रक्टर रॅली काढत निदर्शने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

