🕒 1 min read
कोल्हापूर:- राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 50 लाखांचा निधी देण्याची घोषणा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहे. त्यामुळे आता गावोगावी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, यापूर्वी नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी २५ लाखांचे बक्षिस पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर केले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी या गावाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून, इतरही गावे बिनविरोध करण्याचा निर्णय लंके यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट; कॉंग्रेसला मिरच्या झोंबल्या
- नागपूर : २१ डिसेंबर पासून पाणी बिलावरीलही शास्ती होणार माफ
- नागपूर मनपाच्या माध्यमातून आठ हजार पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज मंजुर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
