🕒 1 min read
मुंबई:- राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं आहे. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यातचं काल सोनिया गांधी यांचा लेटर बॉम्ब आला आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पत्र लिहिले. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. भविष्यात आदिवासी दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार हे गॅसवर असल्याचा दावा भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वंचितांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा राज्य सरकार जनतेला देत नाही. महाविकास आघाडी सरकार गॅसवर आलं असून सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वत:चा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणाऱ्यांनी सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ?
- सोनिया गांधींनी गरीब आणि वंचितांच्या प्रश्नासाठी पत्र लिहिले,भाजपाला उकळ्या का फुटल्या आहेत?
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
