Share

प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व उद्योग आणि व्यवसाय बंद करण्यात आले आहे. या बंदीत अकाल पासून काही उद्योगांना सशर्त सूट देण्यात आली असली तरी देशातील बहुतांश व्यवसाय बंद आहेत.

लॉक डाऊन काळात वाहतूक साखळी पूर्ण विस्कळीत झाली असून याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातीत तयार फळे भाजीपाला ग्राहकापर्यंत पोहचू शकत नसल्याने शेतकर्याचा माल शेतातच खराब झाला आहे. शेतीतील फळे आणि भाजीपाला या नाशवंत पिकांच उत्पादन घेणारे शेतकरी त्यामुळे अडचणीत आले आहेत.

तसेच गेल्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी वाढली पावसानेही शेतकर्यांच्या अडचणीत अधिकच वाढ केली आहे. आत याच पार्श्वभूमीवर शेतकर्यांना काही दिलासा देता यावा यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उप-समितीची बैठक घेण्य्यात आली.

या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , जलसंपदा मंत्री जयंत पाटील , कृषिमंत्री दादा भुसे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित होते. याबाबतची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीटरवरून दिली आहे.

‘प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे , मंत्री राजेश टोपे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री विश्वजीत कदम ही उपस्थित होते.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!