Share

जावडेकरांनी दिल्लीत बसून दिलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही – संजय राऊत

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना साथ रोखण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकरांचा समाचार घेतला आहे. ‘प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचं महाराष्ट्राशी नातं आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

यासोबतच, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं आहे. मात्र राज्यातील जनतेचा लॉकडाऊनला विरोध असल्याचं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. फडणवीसांच्या विरोधावर देखील राऊत यांनी भाष्य केलं आहे.

‘फडणवीसांचा लॉकडाऊनला राज्यात विरोध असेल. मात्र, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?’ असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!