Share

आनंदाची बातमी : राज्यात आज एकाच दिवशी ५५२७ रुग्ण बरे होऊन परतले घरी

Published On: 

मुंबई : राज्यात आज ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे.

एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा, नाना पटोलेंची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!