Share

एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखले आहे. कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकणचा निकाल ९५.८९ टक्के इतका लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यात मुलींनी बाजी मारली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

जिंकलस पोरा : दिवसा हॉटेलमध्ये काम अन् रात्री अभ्यास, बारावीत मिळवलं घवघवीत यश

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो तुम्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन! एकदा तुम्ही ठरवले की तुम्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही.

ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, त्यांनी खचून जायची गरज नाही. आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर आपण यशस्वी होतो असे नाही आणि एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही. तुम्ही सर्व समृध्द महाराष्ट्राचा कणा आहात. सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!

धनंजय मुंडेंचे बड्डे सेलिब्रेशन थेट बारामतीत, पवारांनी भरवला केक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!