Share

महाभकास आघाडी सरकारची आपदाग्रस्तांना मदत करण्यासाठी चालढकल– आमदार महाले

Published On: 

बुलडाणा : अतिवृष्टी आणि महापुरात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. या संकटग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तत्काळ मदत देण्यासाठी चालढकलपणा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

या संदर्भात भाजपच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘बुडीत साखर कारखाण्यांसाठी तीन हजार कोटी तातडीने देणारे महाभकास आघाडी सरकार, आता अतिवृष्टी आणि महापुरातील आपदाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मात्र चालढकल करीत आहे.’

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरले आहे. त्यात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री या भागाचा दौरा करत असले तरी अद्याप शासनाच्या वतीने ठोस आर्थिक मदत या नागरिकांना मिळालेली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!