Share

प्रेम एकासोबत लग्न एकासोबत, नवविववाहितेने केले ‘असे’ काही की शेवट झाला गोड!

Published On: 

🕒 1 min read

जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील एका प्रेमाच्या दुसऱ्या गोष्टीची सध्या भलतीच चर्चा होत आहे. आईवडिलांनी बळजबरीने लग्न लावून दिलेल्या एका तरुणीने शेवटी नवऱ्याच्याच मदतीने आपल्या प्रियकरासोबत लग्न करत संसार थाटल्याच्या या फिल्मी कहाणीवर सध्या तालुक्यात बरीच चर्चा रंगतांना दिसत आहे.

गतवर्षी पासून कोरोना विषाणूमुळे सर्वत्र साध्या पद्धतीने लग्न समारंभ होत आहेत. अगदीच तामझाम न करता चार लोकांमध्ये विवाह सोहळा आटोपून घेण्यात पालक समाधान मानत आहेत. तर वराकडील मंडळीही आपल्या आशाअपेक्षांवर मुरड घालत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी मुलीच्या पाल्यांकडून बळजबरीने विवाह लावून देण्यासारखे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार जालना जिल्ह्यात घडला मात्र या प्रकरणात पुढे जाऊन आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळाला.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील मुलीचे लग्न वाढोणा येथील मुलाशी ठरवण्यात आले. या मुलीचे आधीपासूनच दुसऱ्या मुलावर प्रेम होते. मात्र आईवडिलांनी बळजबरीने या विवाहाचा घाट घातला. मात्र लग्न झाल्यानंतर महिनाभरातच नवविववाहितेने विहिरीत उडी मारत असल्याचा बेबनाव केला. प्रकरण थेट पोलीसांपर्यंत गेले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या सासरच्या मंडळींनी आणि माहेरच्या मंडळींनीही प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचे वचन दिले. सध्या संपूर्ण गावात या लग्नाची आणि अजब प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!