टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून देशात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्ष हे आघाडीवर दिसत आहेत. तर राज्यात गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अशोक नेते हे ३३ हजार मतांनी आघडीवर असून विजयाकडे वाटचाल करत आहेत.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजप युतीकडून अशोक नेते यांना उतरवण्यात आल होत तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीकडून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली होती. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार गडचिरोलीच्या लढतीमध्ये भाजपचे अशोक नेते यांना १३७४५५ मत मिळाली आहेत, तर नामदेव उसेंडी यांना १०४१९८ मत मिळाली आहेत.


