Share

पाच मोठ्या शहरात सक्तीचा लॉकडाऊन लावा, न्यायालयाचा योगी सरकारला दणका

Published On: 

लखनऊ : करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अलहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातील पाच मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचे आदेश दिलेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरमध्ये २६ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या करोना नियोजनाला मोठा धक्का देणारा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!