औरंगाबाद : ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात आठशे ते हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायमस्वरूपी मालमत्ता कर माफी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील(Rajendra date patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav thackrey) यांच्याकडे केली आहे. त्यावर मुख्यमंत्री सचिवालयाने त्यांचे हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक(Mahesh pathak) यांच्याकडे पाठवले आहे.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम चौरस फुटांपर्यंत होण्याची शक्यता असली तरी आता औरंगाबाद शहराची करमाफी देण्याचा निवड ‘स्मार्ट सिटी प्रकल्पात’ झालेली आहे. सत्ताधारी असल्याने इतर स्रोतातून उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय वाढ होऊ शकते, असेही दाते पाटील यांनी म्हटले आहे. महापालिकेने ५०० क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता ठराव मंजूर केले होते. शिवसेनेसह ठाण्यातील नगरसेवकांनी मंजुरी दिली.
त्याच धर्तीवर औरंगाबादेतही ८०० चौरस ते १००० फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्तांना कायमस्वरूपी करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास द्यावेत. तसेच त्या अनुषंगाने मनपा प्रशासकांनी तसा ठराव घेऊन राज्य शासनाकडे पाठविण्याचे आदेशित करावे असे म्हटले आहे. औरंगाबादकरांना या करमाफीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता जरी असली तरी औरंगाबाद शहराची निवड स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेली असल्यामुळे इतर स्रोतामुळे उत्पन्नात मोठया प्रमाणावर वाढ होणार आहे. त्यामुळे औरंगाबादकरांच्या हितासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घ्यावा. असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील
- ‘केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा’
- औरंगाबादेत जिन्सी प्रकरण रंगले; आजी-माजी प्रशासकांचा पलटवार!
- ‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

