टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न, मुद्दे, त्यांच्यासमोरील समस्या आणि दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहे. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याच्या भेटीची वेळही मागितली आहे.
ग्रामस्थांची कैफियत व समस्या पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्याकडे कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्याच्या दृष्टीने मांडल्या आहेत व @CMOMaharashtra, संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांसह तातडीने बैठक आयोजित करून दुष्काळग्रस्त प्रतिनिधींसह भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे. pic.twitter.com/Si200J8qPX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 15, 2019
सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

