मुंबई : राज्यात आज ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,१६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४०६ (४२), ठाणे- २६० (८), ठाणे मनपा-२०६ (९), नवी मुंबई मनपा-३६६ (११), कल्याण डोंबिवली मनपा-४३० (७), उल्हासनगर मनपा-२५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१७ (१), मीरा भाईंदर मनपा-१८२ (५), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२०० (५), रायगड-२९५ (३), पनवेल मनपा-२६८ (६), नाशिक-२२४ (६), नाशिक मनपा-५३८ (१०), मालेगाव मनपा-४६, अहमदनगर-३१६ (२),अहमदनगर मनपा-२०८ (२), धुळे-१२० (३), धुळे मनपा-११६ (२), जळगाव-५८४ (५), जळगाव मनपा-७१ (३), नंदूरबार-११२ (१), पुणे- ७५६ (२१), पुणे मनपा-१६९२ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (१८), सोलापूर-२६२ (७), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-३२५ (१३), कोल्हापूर-३८७ (१०), कोल्हापूर मनपा-१६८ (१०), सांगली-१८२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७२ (५), सिंधुदूर्ग-२९, रत्नागिरी-१३४ (५), औरंगाबाद-१४७,औरंगाबाद मनपा-१६४ (१), जालना-७५ (२), हिंगोली-१४ (२), परभणी-३५ (४), परभणी मनपा-३५ (२), लातूर-७९ (१), लातूर मनपा-९५, उस्मानाबाद-१३७ (५),बीड,- ३०५ (९), नांदेड-१०५ (६), नांदेड मनपा-१६०, अकोला-१०, अकोला मनपा-९, अमरावती-१९, अमरावती मनपा-४८, यवतमाळ-७७ (२), बुलढाणा-२९, वाशिम-२३ (२), नागपूर-१३५ (२), नागपूर मनपा-९७६ (१५), वर्धा-४८, भंडारा-१९, गोंदिया-४६, चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-३२, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (१).
कधीकाळी विहीरीचे खोदकाम करणाऱ्या दत्तू भोकनळ यांना ‘अर्जुन पुरस्कार’
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.


