कोलकाता – नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं, म्हणजेच सीबीआयनं अटक केलेल्या पश्चिम बंगालच्या चार नेत्यांना मिळालेल्या जामिनाला कलकत्ता उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सुव्रत मुखर्जी, फिरहाद हकीम, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना विशेष सीबीआय न्यायालयानं काल संध्याकाळी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच उच्च न्यायालयानं या जामिनाला स्थगिती देत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चारही नेत्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगात नेण्यात आलं असून या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे. नारदा न्यूज या संकेतस्थळाच्या मॅथ्यू सॅम्युएल यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे चौघेही नेते लाच घेताना कॅमेरामध्ये कैद झाले होते. सीबीआयने सोमवारी छापेमारीनंतर या सर्व नेत्यांना अटक केली होती.
सीबीआयच्या या कारवाईनंतर, बंगालमधील पराभव पचवणे मोदी सरकारला जड जात असल्यामुळेच ते अशा प्रकारची बदल्याची कारवाई करत असल्याचे तृणमूलने म्हटले आहे.दरम्यान, ही कारवाई भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करत टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धडकले तेव्हा निदर्शने करण्याबरोबरच दगडफेक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वसामान्यांची लुटमार सुरूच; पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा झाली वाढ
- जयंत पाटलांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाला लावले कामाला
- आर अश्विनकडून नकळत झाली मोठी चूक ; सोशल मीडियावर मागितली सर्वांची माफी
- चंद्रपूर शहरात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी जोगरेवारांनी दिला 1 करोड 49 लाखांचा निधी
- तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

