Share

न विचारता गाडी का नेली म्हणून चाकू हल्ला! दोघांविरोधात गुन्हा दाखल

Published On: 

औरंंगाबाद : मला न विचारता माझी गाडी का घेऊन गेला अशी विचारणा करणा-या गाडी मालकांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुलाबवाडी आदर्शनगर येथे ११ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. उत्तम बाबासाहेब येटाळे (वय २९,रा. जयभीमनगर हाऊनहॉल) असे जखमी झालेल्या दुचाकी मालकाचे नाव आहे.

उत्तम येटाळे याने त्याची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ही दुचाकी त्याला न विचारता परस्पर ऋतिक दाहिजे आणि गोट्या चोथमल (दोघे रा. जयभीमनगर, टाऊनहॉल) यांनी नेली होती. मला न विचारता दुचाकी का घेऊन गेला अशी विचारणा उत्तम येटाळे यांनी केली.

त्यानंतर दोघांनी हातचापट्याने मारहाण करून थेट चाकू हल्ला केला. तर एकाने येटाळे यांच्या डोक्यात फरशी मारून जखमी केले. उत्तम येटाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाकू हल्ला करणा-याविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!