🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- चित्रपटातून राजकारणात आलेले कमल हासन याचं कमल हसनचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. हासन यांनी अशा पद्धतीने गरळ ओकाल्याने नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे.
चैन्नई येथे एका मुलाखतीत बोलताना हासन यांनी पाकव्याप्त कश्मीरचा उल्लेख केला ‘आझाद कश्मीर’ असा केला. सरकार काश्मीरमधील नागरिकांचे जनमत मिळवण्यास का घाबरते? असां सवाल उपस्थित केला. काश्मीरमध्ये जनमत संग्रह करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावे…ते असे का करत नाहीत? असं देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना हासन म्हणाले,भारतीय लष्कर एखाद्या जुन्या फॅशनसारखं आहे. कश्मिरी तरुणांबरोबर बोलायला हवं. त्यांच ऐकायला हवं. पण सरकार त्याला घाबरतयं. त्यांना देशाची विभागणी करायची आहे. दुसरं काही नाही असा आरोपही हासन यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

