टीम महाराष्ट्र देशा : “राज्याची पूनर्रचना होणं आवश्यक आहे. यानंतर विदर्भ वेगळा होईल. कोणत्याही राज्याची लोकसंख्या तीन कोटींच्या वर आणि एक कोटीच्या खाली नको, असं यापूर्वी अनेकांनी सांगितलं आहे. यामुळेच गोवा महाराष्ट्रापासून वेगळं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येप्रमाणे महाराष्ट्राचे तीन किंवा चार भाग होतील. छोट्या राज्यांसाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमला पाहिजे”, अस वादग्रस्त विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्यावर आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत.
यावर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वैद्य यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. “मा.गो.वैद्य कृपया महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका. महाराष्ट्राचे सामाजिक लचके तुम्ही जन्मापासूनच तोडता आला आहात. आता महाराष्ट्राचे भौगोलिक लचके तोडण्याची भाषा तुम्ही करू नका. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्र एक होता एक राहील” अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी वैद्य यांना फैलावर घेतल आहे.
मा.गो.वैद्य कृपया महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका.
महाराष्ट्राचे सामाजिक लचके तुम्ही जन्मापासूनच तोडता आला आहात.
आता महाराष्ट्राचे भौगोलिक लचके तोडण्याची भाषा तुम्ही करू नका.
महाराष्ट्र तुम्हांला माफ करणार नाही.
महाराष्ट्र एक होता एक राहील #TukdeTukdeGang https://t.co/Yrcsk1LRSk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2020
दरम्यान, “जर मनसेला संघाचे हिंदुत्व मान्य असेल तर ते भाजपासोबत येतील. जर त्यांना भाजपाची भूमिका स्वीकृत असेल आणि संघाची व्यापक हिंदुत्वाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपासोबत येईल,” असं देखील वैद्य म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

