टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. अशातच राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. वेळीच पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करा. अन्यथा गोदाम लुटू असा इशारा दिला आहे. राज्यातील सरकारनं घर दोन दिवस पाण्यात बुडल्यास तरच मोफत अन्नधान्य 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देऊ असा जीआर काढला आहे. हा जीआर जनतेची म्हणजेचं’ पूरग्रस्तांची थट्टा करणारा आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील पूरग्रस्तांची सरकारच्या जीआरनं थट्टा
दोन दिवस पाण्यात बुडल्यास तरच मोफत अन्नधान्य
10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देणार
7 ऑगस्टचा राज्य सरकारचा जीआर
मदतीसाठी दोन दिवस परिसर पाण्यासाठी असणं गरजेचं
**
ह्या सरकारचे डोकं फिरले आहे
**
वेळीच मदत करा नाहीतर गोदाम लुटू— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 9, 2019
दरम्यान सरकारच्या या धक्कादायक मदतीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या पूरग्रस्त भागाला शासकीय मदत करण्यासाठी एक नियम आडवा येतोय. कुटुंबातील सर्व वस्तू वाहून गेल्या असूनही मदतीसाठी नियमात बसणं गरजेचं आहे. सलग दोन दिवस घरात पुराचं पाणी असेल, तरच शासकीय मदत मिळते असा नियम आहे. ही अट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या काळात सात दिवसांची होती, जी दोन दिवसांवर आणली, अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

