🕒 1 min read
Jayant Patil | शिर्डी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन भाजप पक्षासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते सतत शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, टीका करत आहेत. तर हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचंही बोललं जात आहे. अशातच याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले जयंत पाटील (Jayant Patil)
आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. हे शिबीर सुरू होण्याआधीच जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमचं अधिवेशन झाल्यानंतर, राज्यातील सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच, आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला आहे.
दरम्यान, शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात या शिबिरात विचारमंथन होणार असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | “महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…”; अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित
- Devendra Fadnavis | ‘विरोधक कधीही एकत्र आले तरीही…’; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- Nana Patole | महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले…
- Amruta Fadnavis | ‘आधी कुंकू लाव, मगच बोलतो’, संभाजी भिडेंच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Devendra Fadanvis । “ते कोणाची चाकरी करतात हे सर्वांना माहिती आहे”; जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
