Share

सरकारने योजनांच्या नावावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी कर्जमाफीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. योजनांच्या नावावर या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, यातचं शेतकरी कर्जबाजार झाला आहे, याचमुद्यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. युती सरकारने ५ वर्षात बळीराजाची निव्वळ फसवणूक केली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

इतकेच नव्हे तर, शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे फसवणाऱ्या सरकारची पाच वर्षे संपत आली. मात्र अजूनही ३० लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, असेही पटतील यांनी म्हंटले. तसेच, योजनांच्या नावावर या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत असा टोलाही पाटील यांनी लगावला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!