🕒 1 min read
मुंबई : नागपूरमध्ये काल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राम्हण समाजाबाबत एक वक्तव्य केलं. सध्या भागवतांचं ते विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी भाष्य केलं आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भागवतांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील ?
निवडणुका जवळ आल्या, की अशी काही विधानं करणं आणि त्या वर्गाला चुचकारणं असं धोरण काही लोकांचं असू शकतं, असं म्हणत जयंत पाटील यांनी मोहन भागवत यांना चांगलच फटकारलं आहे. जयंत पाटील यांनी पत्रकांरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलले. पुढे बोलताना पाटील असंही म्हणाले की, या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री आहे की मोहन भागवत भाजपच्या नेत्यांना यासंदर्भात लोकांना विश्वास वाटेल, अशी काही पावलं टाकायला सुचवतील. यातून ते जे भाष्य करतायत, त्याची अंमलबजावणी होऊ शकेल.
मोहन भागवत यांचे वक्तव्य
आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली, असं म्हणत ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.
आनंद दवे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इथला हिंदू नराधमांच्या हाती देण्याचं पाप तुम्ही करत आहात. तुम्हीच पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर भारतात जातीवाद वाढवत आहात. पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला आहे. आतापर्यंत हिंदुत्वाचा जागर केला आणि आता मशिदीत मौलवींना भेटायला जात आहात. म्हणून आता पापक्षालन तुम्हीच करायला हवं.
महत्वाच्या बातम्या :
- Adipurush | “आजच्या काळातील क्रूर” ; ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लुकवरून सुरू असलेल्या टीकांवर ओम राऊत यांची प्रतिक्रिया
- Nashik Accident | “सकाळी मला कंडक्टरचा फोन आला, तो पॅसेंजरला उठवायला मागे गेला अन्…”, कंपनीने सांगितला ‘तो’ प्रसंग
- Aanand Dave | “पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे”
- Eknath Shinde | शिंदे गट नोंदणीकृत नाही, मग दसरा मेळाव्यात खर्च करण्यासाठी पैसे आले कुठून?, याचिकेतील ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे
- Nashik Accident | नाशिक अपघातातील मृत्यूंच्या संख्येत वाढ, दहा नाही तर बारा जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
