Share

लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – लोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे. १५ लाख नाही पण किमान पन्नास-साठ हजार तरी खात्यात येतील अशी अपेक्षा लोकांची होती, पण भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः स्पष्ट केलं की १५ लाख हा जुमला होता, त्यामुळे भाजपाचा खोटेपणा उघड झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.भिवंडीत परिवर्तन यात्रेदरम्यान ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार पांडुरंग बरोरा, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,भिवंडी जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे आदींसह भिवंडी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशातील जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. या सरकारमध्ये जे सांगितले ते देण्याची धमक नाही, क्षमता नाही. हे सरकार पूर्णपणे खोटं बोलत आहे, याचे जनतेने थोडे चिंतन करायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!