🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला. या सामन्यातील सामनावीर इशान किशनचे सगळीकडे कौतुक होत आहे. किशनच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवीण्यात आले. सामन्यानंतर बोलताना हा सामनावीर पुरस्कार मी माझ्या प्रशिक्षकांच्या दिवंगत वडीलांना समर्पीत करतो असे म्हणाला.
सामन्यानंतर इशान म्हणाला,”काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशिक्षकांच्या वडिलांचे निधन झाले. आजची खेळी मी त्यांना समर्पित करतो. माझ्या प्रशिक्षकांनी त्यांच्या वडिलांसाठी किमान अर्धशतक झळकाव, असे सांगितले होते. त्यामुळेच हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो.’ यावेळी सामन्यापुर्वी रोहित शर्माने आयपीएलमध्ये खेळतोस, तसाच खेळ आणि मनात कोणताही गोंधळ ठेऊ नकोस असा सल्ला दिला होता.
टी-२० पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी अजिंक्य रहाणेनं पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. तसेच पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा इशान किशन हा चौथा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मोहित शर्मा , पृथ्वी शॉ, नवदीप सैनी यांनी पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या
- शालूच्या व्हिडिओवरती आशिक पोरांच्या प्रेमाची साद
- जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता खंबाळा येथे भरला आठवडी बाजार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
- औरंगाबाद विमानतळावर नियमित विमानफेऱ्या सुरू करा : खा. डॉ. भागवत कराड
- सायली संजीवचा ट्रेडिशनल लुक ; सेलिब्रिटींनीही केल्या कॉमेंट्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
