युएई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. कालच्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामान्यमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दिल्लीच्या संघाला अजून एक संधी असली तरी आज होणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यातील सामना मात्र अत्यंत महत्वाचा आहे.
आज बेंगलोर आणि हैद्राबादमध्ये ‘करो या मरो’ सामना होणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायर २ मध्ये दिल्लीशी सामना करेल. तर, आजचा सामना जो संघ हरेल त्या संघाचं यंदाच्या आयपीएल सत्रातील आव्हान संपुष्टात येईल.
काल, दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा डोंगर रचून दिल्ली समोर कडवं आव्हान उभं केलं. यानंतर, दिल्लीच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली आणि तब्बल 57 धावांनि विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात धडक मारली. आज, जो संघ जिंकेल त्याचा सामना दिल्लीशी होईल. यानंतर, दिल्लीसोबतच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ आयपीएलच्या विजेतेपदासाठी मुंबईशी झुंज करेल.
महत्वाच्या बातम्या
- अन्न पदार्थात भेसळ करणे आता पडणार चांगलेच महागात
- अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
- टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन
- राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी;चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- शेतकरी विरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही : कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
