Share

रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी अक्षरशः अव्वाच्या सव्वा भाव देऊन काळ्या बाजारातून खरेदी केलं जात आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलले असून या इंजेक्शनमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या अनेक टोळ्यांना देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे. दरम्यान, राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन वरून राजकारण तापल्याच पाहायला मिळत आहे.

रेमडेसिविरच्या साठेबाजीच्या संशयावरून ब्रुक कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी पार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु होत्या.

आता, राज्याचे सार्वजनिक बांधकाम बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राकडे महत्वाची मागणी केली आहे. ‘रेमडेसिविरचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए ) व सक्तवसुली संचालनालय (ईडी ) यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!