Share

“मागील ५ वर्षांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला”, आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच मागील ५ वर्षांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असेही आदित्य म्हणाले.

यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘आमची जेव्हा भाजपसोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. परंतु मागील ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. हेच एनडीएतील इतर पक्षांसोबतही झाले’, असे आदित्य म्हणाले.

दरम्यान, पुढे उत्पल पर्रीकर यांच्या संदर्भात विचारण्यात आले असता आदित्य म्हणाले की‘शिवसेनेने जितकी मैत्री जपायची होती, ती खुलेपणाने जपली आहे.’ तसेच आम्ही उत्पल पर्रीकरांना देखील साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!