Share

पिशोर तालुक्यात वीज पडल्याने बैल ठार, अवकाळी पावसाने रब्बी जाण्याची भीती

Published On: 

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शुक्रवारी पहाटे विजेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे रब्बी हंगामातील पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर पिशोर शिवारातील जाधव यांच्या शेतात असलेल्या बैलावर वीज पडल्यामुळे बैल ठार झाल्याची पहाटे घडली आहे.

शुक्रवार रोजी पहाटे अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडटासह पाऊसास सुरुवात झाली. रब्बी हंगामात अचानक अवकाळी पाऊस आल्याने हाता तोंडाशी आलेले गहू कांदा, हरभरा, या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तर खळ्यावर काढून ठेवलेल्या गहू भिजल्याने हातात आलेल्या पिकांचे ही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान पिशोर शिवारातील मोहंद्री भागातील गट नं १७३ मधील कैलास सर्जेराव जाधव या शेतकऱ्याच्या गोठयातील बांधलेल्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.

तर विजेच्या आवाजाने इतर जनावरे दावे तोडून बाजूला सैरावैरा पळाले मात्र यात एका बैलाचा वीज पडून दुर्दवी मृत्यू झाला असल्याने महसूल विभागाच्या तलाठी दीपाली बागुल कोतवाल हरून शेख यांनी पंचनामा केला आहे सदरील घटनेत पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..तर डॉ चोले व सहकारी संतोष वाघ यांनी तपासणी केली. या शेतकऱ्यास लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!