Share

बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा कहर; १ कोटी जनतेचे जनजीवन विस्कळीत

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. यासमुळे 6 राज्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, झारखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. ओडिशा पश्चिम बंगालसह तमिळनाडू कर्नाटकमध्ये मंगळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात या वादळाचा मोठा धोका पाहायला मिळतो आहे.

यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे.

परंतु आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे प्रचंड पाणी साचले आहे. यामुळे अनेक घरांवरचे छप्पर उडून गेलेत. या वादळामुळे सध्या १ कोटी जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!