Share

‘शरद पवारांनी बिहारमध्ये लक्ष घातलं असतं तर…’ ; भातखळकरांचा उपरोधिक टोला

Published On: 

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.

काल संध्याकाळी जवळपास जेडीयू-भाजपचा विजय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. निवडणूक दोन घटकांमध्ये झाली. एकाबाजूला अनुभवी नेत्यांची फळी होती तर दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांचं युवा नेतृत्व. बिहारमधील बदलाला हळूहळू वाट दिसत आहे. तेजस्वी यादव लढले ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील, असं ते म्हणाले.

तर, तेजस्वीच्या रूपानं नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी बिहारकडे लक्ष दिलं नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याचा उल्लेख करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना उपरोधिक टोला लगावला आहे. “किती हो वाईट काका… थोडं लक्ष दिलं असतं तर बिहारमध्येही तेजस्वी यादवला वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करता आलं असत, कडी लावून राज्यकारभार चालवता आला असता, अग्रलेखातून, फेसबुक लाईव्ह वर तोंडाच्या वाफा सोडता आल्या असत्या… 9 किमीचा वाफांचा ढग बनवता आला असता” अशी टीका भातखळकरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!