नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकर कठोरपणे बोलले म्हणून जनतेचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते.असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. ते ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते. आता यावरूनच एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोहन भागवत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ते विकृत इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून टाकतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवन लाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले. असा विकृत इतिहास मोहन भागवत मांडत आहेत. असा टोला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
दरम्यान वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते त्यांनी तर उर्दूमध्ये गझल लिहिली होती. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल. असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
- ‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
