🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबतच नेतेमंडळींनाही बसला आहे. जवळपास ४८ तासांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन एकिकडे ठप्प झाली तर, दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचल असल्याने त्यांना देखील हा त्रास सहन करावा लागला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिक यांनी त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो पोस्ट केले. माझं घर…. असं लिहित त्यांनी घरातील काही फोटो पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांनी ‘करुन दाखवलं’ असं लिहित या पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

दरम्यान, ‘निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना मतं मिळाली, पण सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र अद्यापही दुर्लक्षितच आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांचे जीव धोक्यात असताना सत्ताधऱ्यांना मात्र काहीच फरक पडत नाही’, असा संताप नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC
Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2019
Thanks @MCGM_BMC pic.twitter.com/VTmhEtKcav
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
