शिरोळा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. आयुष्यात त्यांनी कधी घरातला किराणा तरी आणला आहे का, व्यवहार केला आहे का, यांना संसार चालवण्याचा अनुभवच नाही तर ते देश कसा चालवणार ? असा प्रश्न उपस्थित केला.
धनंजय मुंडे म्हणाले, जनता जर जागरूक राहिली तर लोकं देशाच्या चौकीदाराची पुन्हा नेमणूक करणार नाही. जनतेत इतका रोष आहे की आताच्या सत्ताधाऱ्यांना २०१९नंतर कोणी ओळखणारही नाही. भाजपने तरुणांचा अपमान केला आहे. हा तरुण आता या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. असेही मुंडे म्हणाले.
आश्वासन पूर्ण करण्यासाठी अनुभव लागतो. पंतप्रधान मोदी यांच्याकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. आयुष्यात नरेंद्र मोदी यांनी कधी घरातला किराणा तरी आणला आहे का? शेती केली आहे का? व्यवहार केला आहे का? यांना संसार करण्याचा अनुभवच नाही तर सरकार चालवतीलच कसं? – @dhananjay_munde #HallaBol pic.twitter.com/yrLVhUt5rN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 5, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

