Share

उद्योग क्षेत्रात गुंडागिरी सहन केली जाणार नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तंबी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात उद्योजकाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री तसेच औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग क्षेत्राच्या संबंधीत अशा प्रकारची गुंडागिरी सहन केली जाणार नसल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. औरंगाबादमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामगाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित कंपनीच्या मालकाला काही लोकांनी मारहाण केली होती. त्या नंतर जिल्ह्यातील सर्वच उद्योजकांनी नाराजी व्यक्त करुन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. उद्योग संघटनांनी याची तक्रार केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकरणावर त्वरीत कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. औरंगाबादमध्ये उद्योग क्षेत्रात वाढ होत असताना विकासाला खिळ बसवणाऱ्या या घटना असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे. वातावरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल, तर ते सरकार सहन करणार नाही. राज्य सरकार उद्योग क्षेत्राच्या बाजूने खंबीरपणे असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!