🕒 1 min read
मुंबई: राज्यातील ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरू झाली असून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच ३३७ ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुख्य याचिकाकर्ते विकास गवळी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सातत्याने लढत असलेल्या लढाईला आज यश प्राप्त झाले आहे. हे संपूर्ण यश राज्याच्या ओबीसी प्रवर्गाचे आहे. यापुढील लढाई ही ओबीसींनाही आरक्षणात बजेट मिळावे यासाठी असणार आहे.”, असे विकास गवळी यांनी म्हटले आहे.
तर बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीत कोर्टाचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. दरम्यान माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता. आज कोर्टाने याच सर्वेक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- iPhone 13 Offer : बजेट LOW पण डिमांड iPhone ची?; आता तुम्हालाही होईल शक्य कारण…
- Shiv Sena | “आम्हाला अनेक गोष्टी…” ; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शिवसेनेची प्रतिक्रिया!
- Jayant Patil : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; जयंत पाटलांचं मोठं विधान
- S Sreesanth : “विराटच्या टीममध्ये असतो तर…”, भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- Devendra Fadnavis | सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आमची केस…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
