करमाळा – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, लोकडाऊन सुरू असल्यामुळे याची झळ करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर पडली असून गेल्या ४८ महिन्यांचाही पगार न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
यातच करमाळ्यातील शेतकरी कामगार संर्घष समितीच्या वतीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील साठ कामगारांना एक महिना पुरेल एवढा किराणा माल देण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे अॅड अनिल कांबळे, डॉ जयदत्त कांबळे यांच्या हस्ते आदिनाथ कारखान्यातील साठ कामगारांना घरपोच किराणा माल देण्यात आला. दिनेश घोलप,डॉ जयदत्त कांबळे, संतोष सपाटे,अॅड अनिल कांबळे,सतोष गुगळे, शहाजी ठोसर,आप्पा भोसले यांनी मदत केली.
हेही पहा –


