टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. मात्र परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे बाजारपेठांवर देखील याचा परिणाम होत आहे. शुक्रवारी मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस असेल असा अंदाज वर्तवला आहे.
ऑक्टोबर महिना संपत आली तरीही पाऊस मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. सिंधुदुर्गात गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तसेच राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नगर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबादमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा इशारा कोकण किनापट्टीजवळील नागरिकांना सावधानतेचा देण्यात आला आहे. दरम्यान या परिसरात वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1187622125579857921?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187621732586180608?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

