Share

शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, आ.निलंगेकरांची मागणी

Published On: 

लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये एवढी मदत तातडीने करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.

आमदार निलंगेकर म्हणाले की, ‘मराठवाड्यात गेल्या १५ दिवसांत अतिवृष्टीमुळे २५० मंडळात शेकडो लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. अनेक पक्की घरे पडली आहेत, खरिपाचे पीक १००% वाया गेले आहे, सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली आहेत. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्याने आजवर कधीही अनुभवली नव्हती. खरे तर ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत द्यायला हवी होती. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याची महाविकास आघाडी सरकारची इच्छाच नाही असे दिसून येते.’

मागील वर्षी सुद्धा झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. निदान यावर्षी तरी राज्य सरकारने पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत, पोहोचवून त्यांना संकटमुक्त करावे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामे व नुकसानीच्या अहवालांची वाट न पाहता मदत जाहीर करावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!