जालना : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या हातून पिक निघून गेले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप पंचनाम्यासाठी देखील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे.
या संदर्भात आमदार लोणीकर म्हणाले की, ‘घनसावंगी जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव, पाणेवाडी, सिंदखेडा, कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, अंतरवाली, तर्थपुरी मोहपुरी, निपाणी पिंपळगाव, माणेपूरी आदी ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली..! जालना जिल्हासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आता झालेल्या अतिवृष्टी ने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत अश्या परिस्थितीत तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज आहे..!!’
मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे उभे पिक हातातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र, पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुश्रीफ तुम्ही शंभर काय हजार कोटींचा दावा टाका, पण…; चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान
- पत्रव्यवहार करूनही प्रश्न सुटत नसल्याने चक्क वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले
- भाजपा अपयशी मुख्यमंत्र्यांना बदलण्यात व्यस्त आहे; रुपाणींच्या राजीनाम्यानंतर चिदंबरम यांची टीका
- ‘बलात्काऱ्यांना देहदंडाचीच शिक्षा व्हावी अशी कायद्यात तरतूद करा’, उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
- ‘महिलांवर अत्याचार होऊ नये ही सरकारची भूमिका; भाजपशासित राज्यांमध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचे काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

