🕒 1 min read
गुवाहाटी : धर्मनिरपेक्ष देशात सर्वसामान्य जनतेच्या पैशातून धार्मिक शिक्षणासाठी निधी देणं योग्य नसल्याचं सांगत मदरसे बंद करण्याचा मोठा निर्णय आसाम सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. आसाम सरकार मदरसे आणि संस्कृत शाळा देखील बंद करण्याच्या तयारीत आहे.आसाम सरकारचा हा निर्णय चांगलाच वादात सापडण्याची शक्यता आहे.
We will close down State-run madrassas in Assam from November. The government will release a notification in this regard: #Assam Minister Himanta Biswa Sarma pic.twitter.com/CukmgSnJG0
— ANI (@ANI) October 10, 2020
आसाम सरकारचे मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार,नोव्हेंबर महिन्यापासून आसाममध्ये सुरू असलेले सरकारी मदरसे बंद केले जाणार आहेत यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्वजनिक पैशांचा वापर धार्मिक शास्त्र आणि ग्रंथ शिकवण्यासाठी आता यापुढे सरकार खर्च करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
या संदर्भात एक पत्रकही जाहीर करण्यात आलं असून भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे अनुकरण आता इतर कोणती राज्ये करतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच आता या निर्णयावर मुस्लीम तुष्टीकरणाची राजनीती करणारे पक्ष तसेच भाजप विरोधक देखील नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- किस्से राजकारणातले : उच्चस्तरीय चर्चा करण्यासाठी ‘गोदरेज कपाटावर’ फोन ठेवणारा मराठी खासदार
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- दिलासादायक : नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; राज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर
- वडिलांच्या चितेला अग्नी देताना चिराग पासवान यांना आली चक्कर
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
