Share

‘महाराष्ट्रातले देव आणि भाविक-भक्त आजही पारतंत्र्यात आहेत’

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. श्रावण हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पहावी लागेल असं स्पष्टपणे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारने मंदिरांच्या बाबतीत घेतलेल्या या भूमिकेवर भाजपकडून सातत्याने टीका होत आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारला डिवचले आहे. सबंध देश ७५ वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने साजरा करत असताना ठाकरे सरकारने मात्र देवी-देवतांना बंदिस्त करुन ठेवलेले असणं हे फारच दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातले देव आणि भाविक-भक्त आजही पारतंत्र्यात आहेत. ठाकरे सरकारकडे थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर ७५ व्या स्वातंत्र्य दिनी तरी म्हणजेच १५ ऑगस्टला मंदिरं खुली करुन आमच्या देवांना स्वतंत्र करावं असं भोसले यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!